महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अतिउत्साही मनसैनिकांनी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यानंतर एका अधिकार्याच्या दालनात घुसून नेहमीप्रमाणे राडा केला. आता अशुद्धलेखन करणार्या मराठी ब्लॉगलेखकांनी (म्हणजे सगळ्याच मराठी ब्लॉगलेखकांनी) सावध राहणे अतिशय गरजेचे आहे.
पण एका गोष्टीची आता आशा वाटते. अशुद्धलेखन या एकाच निकषावर कितीतरी मराठी ब्लॉग हे मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकतात.
